Showing posts with label mi marathi. Show all posts
Showing posts with label mi marathi. Show all posts

Wednesday, June 23, 2010

Get Free Wallpapers oF Marathi World मराठी वॉलपेपर्स,











Mi Marathi-मी मराठी-मराठी वॉलपेपर्स,मराठी शोध ,marathi wallpapers,Marathi Greetings,Marathi Images,Marathi Photos,Marathi Photos,Marathi Fotos,Marathi Scraps,Marathi Mobile wallpapers,Marathi Desktop wallpapers,Marathi BAckgrounds,Amhi MArathi Tradition,Just About Marathi World,



Tuesday, May 11, 2010

तेलगळतीमुळे ऑलिव्ह रिडलीची हजारो अंडी नष्ट


तेलगळतीमुळे ऑलिव्ह रिडलीची हजारो अंडी नष्ट

ऋषिकुल्य रूकरी (ओरिसा) - गंजम जिल्ह्यातील ऋषिकुल्य नदीच्या मुखावरील पुळणीवर, नामशेष होण्याचा धोका असलेल्या ऑलिव्ह रिडली कासवांची हजारो अंडी फलित होऊ शकली नाहीत. जवळच्या गोपाळपूर बंदरात झालेल्या तेलगळतीचा परिणाम असल्याचा पर्यावरणवादी संघटनांनी दावा केला आहे.




अंडी फलित होण्याचा काळ गेल्या आठवड्यातच संपला. मात्र ४० ते ५० टक्के अंडी फलित होऊ शकलेली नाहीत. ही संख्या काही हजार इतकी आहे. जवळच्या बंदरातील तेलगळतीमुळे, कासवांच्या घरट्यांपर्यंत तेलतवंग पोचले होते. त्यामुळेच ही अंडी फलित होऊ शकली नाहीत, असे ऋषिकुल्य सागरी कासवे संरक्षण समितीचे सचिव रवींद्रनाथ साहू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



ऋषिकुल्य किना-यावरील कासवांच्या घरट्यांच्या क्षेत्रातील सात किलोमीटरपर्यंत तेलतवंग पसरलेला आहे. गेल्या १२ एप्रिल रोजी जवळच्या गोपाळपूर बंदरात एस्सारच्या मालकीच्या तेलाच्या टँकरमधून आठ टन फर्नेस ऑईलची गळती झाली आहे. भरतीच्या लाटांमुळे ते तेल किना-यावर पसरले.



साहू म्हणाले, की ऋषिकुल्य गावातील अनेक ग्रामस्थांनी तेलाने लडबडलेली मोठी कासवे प्रत्यक्ष पाहिली आहेत. यंदा ओरिसातील या किना-यावर १,५५,००० दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांनी मार्चमध्ये घरटी केली होती. गेल्या तीन आठवड्यांपासून ही अंडी फलित होऊ लागली आणि गेल्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली.

ओरिसात व्याघ्रगणनेस वनाधिका-यांचा नकार

ओरिसात व्याघ्रगणनेस वनाधिका-यांचा नकार

भुवनेश्वर - ओरिसातील नौपाडा जिल्ह्यातील सुनाबेडा अभयारण्यात व्याघ्रगणनेस, वन खात्याच्या अधिका-यांनी नकार दिला आहे. या जंगलात माओवाद्यांचा वावर असल्याची भीती त्यांना भेडसावत असल्याने, ही मोजणी आपल्या जिवावर बेतू शकते, असे त्यांना वाटते.




या जंगलात माओवादी मुक्तपणे फिरत आहेत, अशी तक्रार वनाधिका-यांनी केली आहे. गेल्या ८ मे पासून या जंगलात वाघांची शिरगणती सुरू झाली आहे. या संदर्भात राज्य सरकारला कळविण्यात आले आहे, असे ओरिसाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. एन. पाधी यांनी सांगितले.



छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे गेल्या २९ एप्रिलला माओवाद्यांनी बीएसएफच्या पथकावर केलेल्या हल्ल्यानंतर, अनेक माओवादी ओरिसात शिरले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संगराम स्वेन या वन कामगाराने त्यांना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा पाधी यांनी केला आहे.



या अभयारण्यात माओवादी असल्यास त्याची गृह खात्याला माहिती असावी, असे वन खात्याचे सचिव यू. एन. बेहेरा यांनी सांगितले. सुनाबेडा अभयारण्यात १५ गावे असून चाकुईता, पहारिया आणि भुंजिया या जमातींचे सुमारे १५ हजार आदिवासी राहतात. या आदिवासींनी यापूर्वीही माओवाद्यांशी संघर्ष केला आहे. या अभयारण्याने ६०० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले असून, त्याची सीमा छत्तीसगड राज्याला भिडली आहे.

Ref : Eskal

कागदी पिशव्यांच्या वापरासाठी रोटरी क्‍लबतर्फे जनजागृती

कागदी पिशव्यांच्या वापरासाठी रोटरी क्‍लबतर्फे जनजागृती

पुणे - निसर्गाचे व पर्यावरणाचे संतुलन सांभाळणाऱ्या, जैविक विघटनास सुकर असणाऱ्या प्लॅस्टिकऐवजी रद्दी वर्तमानपत्रांपासून बनविलेल्या कागदी पिशव्यांचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन रोटरी क्‍लब ऑफ पुणे सेंट्रलचे सुरेंद्र श्रॉफ यांनी केले आहे. त्यासाठी प्रचाराची मोहीमही राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.




वर्तमानपत्रापासून या पिशव्या कशा तयार कराव्यात, यासाठी क्‍लबतर्फे देशभरात आतापर्यंत चारशे ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास चार हजार नागरिकांनी प्रशिक्षण घेतले आहे, तर चाळीस गटांनी हे उपजीविकेचे साधन बनविले आहे. या गटांनी आतापर्यंत एक कोटी पिशव्यांची निर्मिती करून विक्री केली आहे. त्यासाठी क्‍लबतर्फे आर्थिक मदतही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.



या पिशव्यांमुळे पर्यावरणाचे संतुलन राहत असून मलनिस्सारणाचे पाइप तुंबणे, जनावरांना त्रास होणे आदी सर्वच गोष्टींना आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच पन्नास पैशांपासून ते पाच रुपयांपर्यंत या पिशव्या उपलब्ध होऊ शकतात. एक किलोपासून 15 किलोपर्यंतचे वजन त्या पिशव्या पेलू शकतात. त्यामुळे ज्यांना या पिशव्या हव्या असतील अथवा तयार करण्याचे प्रशिक्षण हवे असेल, त्यांना क्‍लबतर्फे निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी इच्छुकांनी 9850561557 अथवा 25677498 येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्रॉफ यांनी केले आहे.

Monday, May 10, 2010

तंत्रज्ञानामुळे बसतोय घातक वायूंना आळा

तंत्रज्ञानामुळे बसतोय घातक वायूंना आळा

पुणे - "नवनवीन तंत्रज्ञानामुळे घातक वायूंना आळा बसण्यास मदत होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच देश कमी-अधिक प्रमाणात या दिशेने प्रयत्न करीत आहेत. ओझोन थराला हानी पोचविणाऱ्या "क्‍लोरोफ्लुरो कार्बन' वायूची निर्मिती सर्वच देशांनी नवीन तंत्रज्ञान वापरून एक जानेवारी 2010 पासून थांबविली आहे. आता वातानुकूलित यंत्रांमधून निर्माण होणाऱ्या "हायड्रोफ्लुरो कार्बन'ला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,'' अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातील ओझोन कृती गटाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. या विशेष मुलाखतीत पर्यावरण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल श्री. शेंडे यांनी भाष्य केले.




पृथ्वीपासून 15 ते 40 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या "ओझोन' थराला हानी पोचविणारे एकूण 97 वायू आणि रसायने आहेत. त्यात "क्‍लोरोफ्लुरो कार्बन' हा रेफ्रिजरेटरमध्ये वापरण्यात येणारा प्रमुख घटक आहे. क्‍लोरोफ्लुरो कार्बनचा वापर रेफ्रिजिरेटरमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असे. त्या संदर्भात श्री. शेंडे म्हणाले, "क्‍लोरोफ्लुरो कार्बनमुळे ओझोनला धोका असल्याचे 1975 मध्ये पुढे आले. विकसित देशांनी या संशोधनाला विरोध केला. मात्र, 1985 मध्ये "नासा' आणि "युरोपियन स्पेस एजन्सी'च्या शास्त्रज्ञांनी धोक्‍याचा नव्याने इशारा दिल्यानंतर त्यांना जाग आली. 1987 मध्ये 24 देशांनी एकत्र येत "मॉंट्रियल करार' केला. इतर देशांनाही त्याचे महत्त्व पटले. संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेले सर्व देश त्यात सहभागी झाले. करारातील उल्लेखानुसार पर्यायी वायूंवर संशोधन सुरू झाले. विकसित राष्ट्रांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे घातक वायूंची निर्मिती पूर्णपणे थांबविण्यात यश आले. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाला अपायकारक वायूंचेच उत्पादन बंद करण्यात असे यश मिळते आहे.''



संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमांनिमित्त श्री. शेंडे भारत दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, "पर्यावरण वाचविण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या सर्व देशांनी "मॉंट्रियल करार' केला आहे. रेफ्रिजिरेटर आणि एअर कंडिशनरमध्ये तयार होणारे अनुक्रमे क्‍लोरोफ्लुरो आणि हायड्रो क्‍लोरोफ्लुरो हे वायू "ओझोन' थराला हानी पोचवितात. तापमानवाढीस क्‍लोरोफ्लुरो कार्बन वायू जास्त हानिकारक असतो. करारानुसार सर्व देश या वायूला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी विकसित देशांकडून विकसनशील देशांनाही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2030 पर्यंत "एसीएफसी' पूर्णपणे नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. सन 2007 मध्ये या देशांनी एकत्र येऊन पर्यायी वायू वापरण्याचा निर्णय घेतला आहे. "एसीएफसी' वायू तापमानवाढीस किती घातक आहे, हे विकसित देशांना पटवून देण्यास बराच काळ लागला. पर्यावरणाच्या रक्षणासाठी "एसीएफसी'चे उत्पादन बंद करण्यात यश आले, तसेच आता "हायड्रो क्‍लोरोफ्लुरो कार्बन' या वायूचे उत्पादन बंद करण्यात यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.''



ओझोन गटाचा उद्देश

- जागतिक तापमानवाढ रोखणे

- ओझोनच्या थराचा होत असलेला ऱ्हास थांबविणे

- कार्याची व्याप्ती संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असेलेल्या जगभरातील 195 देशांमध्ये
 
 Ref : Esakal

Saturday, May 8, 2010

कापूस उत्पादकांसाठी नव्या खताचे वरदान


कापूस उत्पादकांसाठी नव्या खताचे वरदान

हिस्सार - कापूस उत्पादक शेतक-यांना आता मे आणि जूनमधील भाजून काढणा-या उन्हातही आपल्या पिकांचे रक्षण करता येणार आहे. येथील शास्त्रज्ञांनी अथक संशोधन करून, नवीन प्रकारच्या व्हर्मी कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे. या खताच्या वापरामुळे कापसाचे ४५ ते ४८ अंश सेल्सिअस उष्णतेमध्येही योग्य संरक्षण होते, असा दावा करण्यात आला आहे.



या नव्या व्हर्मी कंपोस्ट खताला 'एझोटिका एचटी-५४' असे नाव देण्यात आले आहे. येथील चौधरी चरणसिंह कृषी विद्यापीठातील मायक्रो बायोलॉजी विभागातील शास्त्रज्ञांनी त्याचे तंत्र शोधून काढले आहे. मे आणि जून महिन्यांतील उन्हामुळे कापसाचे पीक कोमेजते आणि त्याच्या वाढीवर परिणाम होतो. ४५ ते ४८ अंश सेल्सिअस उष्णतेमध्ये हे पीक करपून जात असल्याचा अनुभव आहे. मात्र अशा उन्हातही ते टिकून राहावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून संशोधन चालू होते.


कडक उन्हामुळे अॅझोटोबॅक्टर, रिझोबियम, अॅजोस्पिरिलम, ग्लुकॉन ही वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सूक्ष्मद्रव्ये नष्ट होतात. मात्र 'एझोटिका एचटी-५४'मुळे ४८ अंशापर्यंतच्या उन्हातही या द्रव्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पोचत नाही, असे दिसून आले. हे खत विविध प्रकारांनी वापरता येऊ शकते. परंतु, बियाणांवर त्याची प्रक्रिया केल्यास, त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो, असे येथील शास्त्रज्ञांनी सांगितले.

REF.- Esakal




Tuesday, May 4, 2010

मराठी उखाने

मराठी उखाने

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा...


लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...!


अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश


सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!




***रावांची थोरवी मी सांगत नाही


कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!




इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव


**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!



सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून


***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून!!



पावाबरोबर खाल्ले अमूल बटर...

***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर



एक होती चिऊ एक होती काऊ...

***रावांच नाव घेते , डोक नका खाऊ...



कोल्हापुरी लोकांचा आवडता उखाणा ...

अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस

*** चं नाव घ्यायचा मला नाही आळस



कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र

***** नी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र



ईवले ईवले ह्रीण, त्याचे ईवले ईवले पाय,

****** राव आले नाहीत अजुन,

पिउन पडले की काय....... !!



चांदीच्या ताटात ठेवले होते गहू

लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ



एक होती चिऊ एक होती काऊ

गणपत रावांच नाव घेते , डोक नका खाऊ



अंगणात पेरले पोतेभर गहू

लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ



चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे

घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे



बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या


गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या



लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास

अन गणपतरावांच्या घशात अडकला घास



आजघर माजघर माजघराला नाही दार

गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार



कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला

........शी लग्न करून ......जन्माचा धुपला



कंप्युटरला असते फ़्लॉपी डिस्क

हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क



रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल

गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल



समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू

गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू



लाडाने जवळ गेले, केली जरा घसट

गणपतराव एकदम खेकसले, फ़ारच बाई तिरसट !



बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन.

*****राव बिड्या पितात संडासात बसून



आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..

आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..!!




















ऍनिमेशन क्षेत्रातही मराठी पाऊल पुढे

ऍनिमेशन क्षेत्रातही मराठी पाऊल पुढे

मुंबई - मराठी मालिका अन्‌ चित्रपटांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. मराठीतील प्रतिभावंत कलावंतांची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही मराठी कलाकारांनी आपला झेंडा रोवला आहे. आता त्यापाठोपाठ ऍनिमेशन क्षेत्रातही मराठी पाऊल पुढे पडले आहे. "फ्रेमफ्लिक्‍स ऍनिमेशन अवॉर्ड'च्या पहिल्या दहा नामांकनामध्ये मराठी तरुणांच्या तब्बल चार ते पाच "ऍनिमेशन शॉर्टफिल्म' दाखल झाल्या आहेत. त्यांची नावे सोमवारी जाहीर करण्यात येतील. अंतिम सोहळा 16 मे रोजी गोवा येथे पार पडणार आहे.




"ऍनिमेशन' तसेच "व्हिज्युअल्स इफेक्‍ट'मध्ये आवड असणाऱ्या तरुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी "फ्रेमबॉक्‍स' या आघाडीच्या ऍनिमेशन आणि "व्हिज्युअल्स इफेक्‍ट स्टुडिओ'ने "फ्रेमफ्लिक्‍स ऍनिमेशन अवॉर्ड'ची घोषणा केली. या पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. केवळ भारतातूनच नाही तर भारताबाहेरीलही काही तरुणांनी आपापल्या "शॉर्ट फिल्म' पाठविल्या होत्या. त्यापैकी केवळ दहा "ऍनिमेशन शॉर्टफिल्म'ची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये चार मराठी तरुणांच्या "शॉर्टफिल्म' आहेत. त्यामध्ये पुणे येथील दोन आणि वाशी (नवी मुंबई) व अंधेरी (मुंबई) येथील एकेक "शॉर्टफिल्म' निवडण्यात आली आहे. त्यांची नावे नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. याबाबत "फ्रेमबॉक्‍स'चे सीईओ नवीन गुप्ता म्हणाले, ""आम्ही "ऍनिमेशन'मध्ये "करिअर' करणाऱ्या नवनवीन गुणवान कलाकारांना नेहमीच संधी देत आलो आहोत. महाराष्ट्रातील तरुणांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभला. "धूम' चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी, एएए डिजिटल इमॅजिनचे अरविंद कुमार, प्राणा स्टुडिओजचे नीलेश सरदेसाई अशा एकूण अठरा जणांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.''

Tuesday, February 23, 2010

तुकाराम तथा रामदास

तुकाराम तथा रामदास

17वीं शती में तुकाराम तथा रामदास ने एक ही समय धर्मजागृति का व्यापक कार्य किया। ज्ञानदेवादि वारकरी संप्रदाय के अधिकारियों द्वारा निर्मित धर्ममंदिर पर तुकाराम के कार्य ने मानों कलश बैठाया। पोथी पंडितों के अनुभवशून्य वक्तव्यों तथा कर्मकांड के नाम पर दिखलाए जानेवाले ढोंग का भंडाफोड़ करने में तुकाराम की वाणी को अद्भूत ओज प्राप्त हुआ। फिर भी जिस साधक अवस्था से उन्हें जाना पड़ा उसका उनके द्वारा किया हुआ वर्णन काव्य का उत्कृष्ट नमूना है।




रामदास का साहित्य परमार्थ के साथ साथ प्रापंचिक सावधानता का तथा समाजसंघटन का उपांग है। छत्रपति शिवाजी महाराज के गुरु होने के कारण उनके चरित्र की उज्वलता बढ़ गई। फिर भी उनके द्वारा प्रयत्नवाद, लोकसंग्रह, दुष्टों के दलन इत्यादि के संबंध में दिए गए बोध के कारण उन्हें स्वयं ही वैशिष्ट्य प्राप्त हुआ है। दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टक आदि उनके ग्रंथ परमार्थ के विचार से परिपूर्ण हैं। उनके कतिपय अध्यायों के विषय राजनीतिक विचारों से प्रभावित हैं।



तुकाराम रामदास के कालखंड में वामन पंडित, रघुनाथ पंडित, सामराज, नागेश, तथा विट्ठल आदि शिवकालीन आख्यानकर्ता कवियों की एक लंबी पंरपरा हो गई। शब्दचमत्कार, अर्थचमत्कार, नाद माधुर्य, और वृत्तवैचिय इत्यादि इन आख्यानों की विशेषताएँ हैं। वामन नामक पंडित की यथार्थदीपिका गीताटीका उनकी विद्वत्ता के कारण अर्थगंभीर व तत्त्वांगप्रचुर हो गई है। स्वप्न में तुकाराम का उपदेश प्राप्त कर लेनेवाले महीपति प्राचीन मराठी के विख्यात संत चरित्रकार हो गए हैं। कृष्णदयार्णव का "हरिवरदां" तथा श्रीधर कवि के हरिविजय, रामविजय, आदि ग्रंथ सुबोध व रसपूर्ण होने के कारण आबाल वृद्धों को बहुत पंसद आए। इन परमार्थप्रवृत्त पंडितों की परंपरा में मोरोपंत का विशिष्ट स्थान है। इनके रचित आर्या भारत, 108 रामायण तथा सैकड़ों फुटकर काव्यरचनाएँ भाषाप्रभुत्व एवं सुरस वर्णनशैली के कारण विद्वन्मान्य हुई हैं।



पेशवाओं के समय में "शाहिरी" (राजाश्रित) कवियों ने मराठी काव्य की अलग ही रूप रंग प्रदान किया। रामजोशी, प्रभाकर होनाजी बाला इत्यादि कवियों ने संत कवियों के अनुसार परमार्थ पर काव्यरचना न करते हुए समकालीन इतिहास सामग्री ग्रहण कर वीरसपूर्ण काव्य का निर्माण किया। इन कवियों द्वारा रचित "पोवाडा" (पँवाडा, कीर्तिकाव्य) साहित्य महाराष्ट्र के इतिहास का ओजस्वी अंग है। इन्हीं राजकवियों के लावणी साहित्य में स्त्रीपुरुषों के श्रृंगार का भव्य वर्णन है। यद्यपि इनमें से कितनों ने ही वैराग्य पर भी "लावणी" साहित्य का निर्माण किया है, फिर भी इनका वैशिष्ट्य पोवाड़े तथा श्रृंगारिक लावणियों में ही व्यक्त हुआ है।

Monday, February 22, 2010

मराठी साहित्य इतिहास

मराठी साहित्य इतिहास

मराठी साहित्य की प्रारंभिक रचनाएँ यद्यपि 12वीं शती से उपलब्ध हैं तथापि मराठी भाषा की उत्पत्ति इसके लगभग 300 सौ वर्ष पूर्व अवश्य हो चुकी रही होगी। मैसूर प्रदेश के श्रवण बेल गोल नामक स्थान की गोमतेश्वर प्रतिमा के नीचेवाले भाग पर लिखी हुई "श्री चामुंड राजे करवियले" यह मराठी भाषा की सर्वप्रथम ज्ञात पंक्ति है। यह संभवत: शक 905 (ई सन् 983) में उत्कीर्ण की गई होगी। यहाँ से यादवों के काल तक के लगभग 75 शिलालेख आज तक प्राप्त हुए हैं। इनकी भाषा का संपूर्ण या कुछ भाग मराठी है। मराठी भाषा का निर्माण प्रमुखतया, महाराष्ट्री, प्राकृत और अपभ्रंश भाषाओं से होने के कारण संस्कृत की अतुलनीय भाषासंपत्ति का उत्तराधिकार भी इसे मुख्य रूप से प्राप्त हुआ है। प्राकृत और अपभ्रंश भाषा को आत्मसात् कर मराठी ने 12वीं शती से अपना अलग अस्तित्व स्थापित करना शुरू किया। इसकी लिपि देवनागरी है।




ऐतिहासिक अनुसंधान करनेवाले अनेक विद्वानों ने यह मान लिया है कि मुकुंदराज मराठी साहित्य के आदि कवि हैं। इनका समय 1128 से 1200 तक माना जाता है। मुकुंदराज के दो ग्रंथ "विवेकसिंधु" और "परमामृत" है जो पूर्ण आध्यात्मिक विषय पर हैं। मुकुंदराज के निवासस्थान के संबंध में विद्वानों का एक मत नहीं है, फिर भी नीड जिले के अंबे जोगाई नामक स्थान पर बनी इनकी समाधि से वे मराठवाडा के निवासी प्रतीत होते हैं। वे नाथपंथीय थे। उनके साहित्य से इस पंथ के संकेत प्राप्त होते हैं। ज्ञानदेव तथा नामदेव



मराठी भाषा के अद्वितीय साहित्यभांडार का निर्माण करनेवाले ज्ञानदेव को ही मराठी का सर्वश्रेष्ठ कवि माना जाता है। 15 वर्ष की अवस्था में लिखी गई उनकी रचना ज्ञानेश्वरी अत्यंत प्रसिद्ध है। उनके ग्रंथ अमृतानुभव तथा चांगदेव पासष्टी, वेदांत चर्चा से ओतप्रोत हैं। ज्ञानदेव का श्रेष्ठत्व उनके अलौकिक ग्रंथनिर्माण के समान ही उनकी भक्तिपंथ की प्रेरणा में भी विद्यमान है। इस कार्य में उन्हें अपने समकालीन संत नामदेव की अमूल्य सहायता प्राप्त हुई है। ज्ञान और भक्ति के साकार स्वरूप इन दोनों संतों ने महाराष्ट्र के पारमार्थिक जीवन की नई परंपरा को सुदृढ़ स्थान प्राप्त करा दिया। इनके भक्तिप्रधान साहित्य तथा दिव्य जीवन के कारण महाराष्ट्र के सभी वर्गों के समाज में भगवद्भक्तों का पारमार्थिक लोकराज्य स्थापित होने का आभास मिला। चोखा मेला, गोरा कुम्हार, नरहरि सोनार इत्यादि संत इसी परंपरा के हैं।



इसी समय चक्रधर द्वारा स्थापित महानुभावीय ग्रंथकारों की एक अलग श्रृंखला का आरंभ हुआ। चक्रधर के पट्ट शिष्य नागदेवाचार्य ने महानुभाव पंथ को संघटित रूप देकर पंथ की नींव सुदृढ़ की। इन्हीं की प्रेरणा से महेंद्र भट, केशवराज सूरी आदि लोगों ने ग्रंथरचना की। चक्रधर जी के संस्मरण को बतलानेवाला महेंद्र भट का "लीलाचरित्र" इस पंथ का आद्य ग्रंथ है। इसके अतिरिक्त इनके द्वारा लिखित स्मृतिस्थल, केशवराज सूरी का मूर्तिप्रकाश तथा दृष्टांतपाठ, दामोदर पंडित का वत्सहरण, नरेंद्र का रुक्मिणी स्वयंवर, भास्कर भट का शिशुपालवध और उद्धवगीता आदि महानुभाव पंथ के प्रमुख ग्रंथ हैं। शिशुपालवध तथा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ काव्य की दृष्टि से अत्यंत सरस एवं महत्वपूर्ण हैं।



अब ज्ञानदेव और नामदेव के समय की राज्यस्थिति बदल चुकी थी। यादवों का राज्य नष्ट होकर उसके स्थान पर मुसलमानों का राज्य स्थापित हो जाने के कारण निराशा की गहरी छाया छाई हुई थी। उसे दूरकर परमार्थ मार्ग को फिर से प्रकाशमान बनाने का कार्य मराठवाडा के अंतर्गत पैठण क्षेत्र के निवासी संत एकनाथ ने किया। इनके ग्रंथ विशद तथा साहित्यिक गुणों से संपन्न है। इनमें वेदांत ग्रंथ, आख्यान, कविता, स्फुट प्रकरण, लोकगीत, रामायणकथा इत्यादि नाना प्रकार के साहित्य का समावेश है। एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, भारुड आदि ग्रंथ मराठी में सर्वमान्य हैं। एकनाथ के ही समय में प्रचुर मात्रा में साहित्यनिर्माण करनेवाले दासोपंत नामक कवि हुए। एकनाथ के पौत्र (नाती) मुक्तेश्वर के "कलाविलास" को मराठी भाषा में उच्च स्थान प्राप्त है। इनके लिखे महाभारत के पाँचों पर्व मानो नवरसों से सुसज्जित मंदाकिनी ही हैं।





Thursday, February 18, 2010

आधुनिक काल

आधुनिक काल

1874-1929


हरिनारायण आपटे ने ऐतिहासिक उपन्यासों द्वारा भूतकालीन घटनाओं को बड़े ही सुंदर ढंग से चित्रित किया, तथा सामाजिक उपन्यासों द्वारा स्त्रियों के दु:खी जीवन का हृदयद्रावक चित्र भी खींचा। श्री अण्णा साहेब किर्लोस्कर ने 1880 में शाकुंतल नाटक लिखकर आधुनिक मराठी रंगभूमि की नींव डाली। इन्हीं की परंपरा में गोदृ ददृ देवल ने सबसे पहले प्रभावोत्पादक नाटक लिखकर नाट्य साहित्य को नई दिशा प्रदान की। 1885 से केशवसुत नामक कवि ने काव्यक्षेत्र में नए युग की स्थापना की। ऐतिहासिक सुख में विश्वास, अकृत्रिम प्रेम तथा आत्मनिष्ठा इत्यादि गुण इन कविताओं का वैशिष्ट्य रहा। इनके बाद तिलक, बीदृ गोविदाग्रज, बालकवि चंद्रशेखर, तांबे इत्यादि कवियों ने मराठी कविताओं का सौंदर्य की सामथ्र्य और अधिक बढ़ाया। सावरकर तथा गोविंद ने राष्ट्रीय भावनाओं का उद्दीपन करनेवाली कविताएँ लिखीं। इतिहासाचार्य राजवाडे ने मराठी इतिहास के संशोधन की परंपरा का निर्माण किया। खरेशास्त्री, साने, पारनीस आदि इतिहासज्ञों ने इतिहालेखन के साधनों की महत्वपूर्ण खोज करने का प्रयत्न किया। लोकमान्य बाल गंगा जी तिलक की ओजस्वी विचारधारा के आधार पर खाडिलकर ने उत्कृष्ट पौराणिक एवं ऐतिहासिक नाटकों का निर्माण किया। इसी समय रामगणेश गडकरी ने अपनी लोकोत्तर प्रतिभा से करुण एवं हास्य रस का उत्तम चित्रण किया। श्रीकृष्ण कोल्हाटकर ने अपने हास्यपूर्ण लेखों द्वारा सामाजिक आचार विचार में दिखलाई पड़नेवाली त्रुटियों को सर्वमान्य जनता के सामने ला रखा। लोकमान्य तिलक, आगरकर, परांजपे, नरसिंह, चिंतामणि केलकर आदि प्रसिद्ध लेखक इसी समय देश में विचारजाग्रति का महान् कार्य कर रहे थे। लोकरंजन की अपेक्षा विविध विषयों के ज्ञानभंडार की पूर्ति को अधिक महत्वपूर्ण मानक साहित्यनिर्माण का कार्य किया गया।



1920-1945

इसके बाद की कालावधि में लोकरंजन को अधिक महत्व प्राप्त हुआ। प्रमुख आशय के साथ साथ उद्देश्य की अभिव्यक्ति का भी विचार होने लगा। फिर भी यह नहीं भुलाया गया कि साहित्य ही समाज के मन पर विशिष्ट संस्कार डालनेवाला प्रभावी साधन है। डादृ केतकर, वादृ मदृ जोशी, विदृ सदृ खांडेकर ने कलाप्रदर्शन की अपेक्षा ध्येयवादी जीवनदर्शन को ही अपने उपन्यासों में महत्व का स्थान दिया। श्री मांडखोलकर ने समकालीन राजकीय घटनाओं के आधार पर अनेक उपन्यासों का सृजन किया। श्री विभावरी शिरुकर जी ने अपने कथासाहित्य में संपन्न समाज की महिलाओं के मन की सूक्ष्म विचारतरंगों को बड़ी सफलता से चित्रित किया।



नादृ सीदृ फड़के ने अनेक प्रणयकथाएँ सुदंर शैली में लिखीं जो यथेष्ट लोकप्रिय हुईं। रविकिरण मंडल के कवियों ने, विशेषत: माध्व ज्यूलियन और यशवंत ने वैयक्तिक दु:खों का वर्णन करनेवाले काव्यों की रचना की। इसके बाद के कालखंड में अनिल, बोरकर, कुसुमाग्रज, आदि कवि सामने आए। प्रल्हाद केशव अत्रे ने हास्य एवं समस्याप्रधान नाटकों का निर्माण किया। वरेरकर ने समय समय पर दृष्टिगोचर होनेवाली समस्याओं को प्रधानता देनेवाले नाटकों को सृजन कर बहुत बड़ा कार्य किया। इसी समय व्यक्तिगत चरित्र के आधार पर लिखे गए निबंध भी लघुकथाओं के रूप में सामने आए। श्री मदृ माटे द्वारा लिखित कथाओं में अस्पृश्य समाज के सुख दु:खों की करुण कहानी देखने को मिली। ठीक इसी समय यदृ गोदृ जोशी द्वारा मध्यम वर्गीय समाज के सुख दु:खों को कथाओं का रूप देकर जनता के सम्मुख रखा गया। विदृ दादृ सावरकर, मदृ माटे, केदृ क्षीरसागर, पुदृ गदृ सहस्रबुद्धे, दत्तोवमान पोतदार, आदि विद्वानों ने बहुमूल्य निबंधो द्वारा साहित्यभांडार की अभिवृद्धि की। ददृ केदृ केलकर, रादृ श्रीदृ जोग तथा केदृ नादृ वाटवे ने पौर्वात्य एवं पाश्चिमात्य शास्त्रीय तथा साहित्यकीय विचारों का सांगोपांग अध्ययन किया।



1945-1965

इस कालखंड का आरंभ ही दूसरे महायुद्ध के समय निर्मित साहित्य के आधार पर हुआ। इस काल के वाङ्मय से इसके पूर्व के काव्य और कथाओं के प्रमुख आशय को एवं आविष्कारादि संकेतों को जबरदस्त धक्का लगा जिसके फलस्वरूप साहित्य का मूल्य ध्वस्त होता सा प्रतीत होने लगा। मानव जीवन की असफलता, तुच्छता, घृण्यता तथा परस्पर के अकल्पनीय संबंधों का असुंदर जी की कविताओं ने रसिकों की काव्यदृष्टि में ही परिवर्तन कर दिया। गाडगील, भावे, गोखले आदि मनीषियों द्वारा लिखित साहित्य में मनोमय व्यापार, उग्र वासना का प्रक्षोभ, एवं गूढ़ विचारतरंग इत्यादि की जो विशिष्टता अभिव्यंजित की गई, उसके कारण वाङ्मय का स्वरूप ही बदल गया। विदृ दादृ करंदीकर तथा मुक्तिबोध काव्यों में मानववाद की अभिव्यक्ति हुई। ग्रामीण जीवन का यथार्थ दर्शन व्यंकटेश माडगुलकर ने कराया, तो दूसरी ओर माधव शास्त्री जोशी ने मध्यवर्गीय जीवन का वास्तविक चित्र जनता के सम्मुख रखा। संपन्न वर्ग के स्त्रीपुरुषों के सुख एवं दु:खों का दिग्दर्शन रांगणेकर, कालेलकर, बाल कोल्हाटकर इत्यादि द्वारा लिखे नाटकों में दिखाई पड़ता है, जो विद्याघर गोखले द्वारा लिखित नाटक में प्राचीन संगीत नाट्यकला पुनरुज्जीवित हो उठी है। पेंडसे, दांडेकर, माडगूलकर आदि के उपन्यासों में प्रादेशिक हलचल के साथ सूक्ष्म भावना दर्शन को भी महत्व दिया गया है। श्री रणजीत देसाई एवं इनामदार ने ऐतिहासिक उपन्यासों का पुनरुद्धार किया। इसी प्रकार तेंदुलकर, साठे, खानोलकर इत्यादि ने नए ढंग के नाटकों का प्रणयन किया। कानेरकर जी द्वारा लिखित प्रयोगी नाटक इसी कालखंड में लिखे गए। मर्ढेकर, वादृ लदृ कुलकर्णी, श्रीदृ केदृ क्षीरसागर, रादृ शंदृ वालिंबे, दिदृ केदृ बेडेकर आदि विद्वानों ने साहित्य के मूल सिद्धांतों की चर्चा करनेवाले अत्यंत मूल्यवान् एवं आलोचनात्मक ग्रंथ प्रकाशित किए। नेने, मिराशी, कोलते, तुलपुल इत्यादि विद्वानों का संशोधनात्मक वाङ्मय भी इसी समय निर्मित हुआ। पुदृ लदृ देशपांडे के ठोस विनोदी साहित्य ने रसिकों के मन में अचल स्थान प्राप्त कर लिया।



इस प्रकार सन् 1874 से निर्मित आधुनिक मराठी वाङ्मय रूपधारी सरस्वती की धारा काव्य, कथा, नाटक, उपन्यास, चरित्र, एवं इतिहास संशोधनादि प्रवाहों से दिन प्रति समृद्ध हो रही है।

Tuesday, February 16, 2010

बखर साहित्य

बखर साहित्य

प्राचीन मराठी साहित्य प्रधानत: पद्यमय होने के कारण उसमें गद्य का भाग बहुत छोटा होना स्वाभाविक है। इसमें बखर साहित्य ऐतिहासिक दृष्टि से पूर्णतया साधार न होने पर भी उपेक्षणीय नहीं। कृष्णाजी शामराव की लिखी भाऊ साहेब की बखर, कृष्णाजी अनंत सभासद लिखित शिव छत्रपति की बखर, सोवनी द्वारा लिखी पेशवाओं की बखर इत्यादि बखरें प्राचीन मराठी गद्य के उत्कृष्ट नमूने हैं। इसी प्रकार ऐतिहासिक कालखंड के राजपुरुषों के जो हजारों पत्र प्रकाशित हुए हैं, उनमें भी अनेक साहित्यिक गुणों का मनोरम दर्शन होता है।




अंग्रेजों के पूर्वकालीन साहित्य की सीमा यहाँ समाप्त होती है और एक नए युग का प्रारंभ होता है। इस समय के साहित्य की प्रेरणा प्राय: धर्मजीवन के लिये ही थी, अत: इस दीर्घ कालखंड में निर्मित साहित्य अत्यंत विशद होने पर भी अधिकांश एक ही सा है। काव्यों के विषय, आध्यात्मिक विचार, पौराणिक कथाएँ तथा ऐसी ही अन्य बातें थीं जो थोड़े से हेरफेर के साथ पुन: पुन: आई सी मालूम होती हैं। समय के हेरफेर से तथा व्यक्ति के बदलने से वर्णन की पद्धति बदली परंतु साहित्य में एक ही परमार्थ प्रवाह बराबर बहता रहा।

Sunday, February 14, 2010

नए युग का आरंभ

नए युग का आरंभ

अंग्रेजों के शासन काल से ही महाराष्ट्र के नवयुवकों में अपनी निश्चित सीमा से कुछ दूर जाने के प्रयत्न चल रहे थे। मुद्रणकला का प्रचार होने से साहित्य पढ़नेवाले वर्ग की सर्वत्र वृद्धि होने लगी, अत: उनकी संतुष्टि के लिये साहित्यिक भी नवीन साहित्यक्षेत्रों में प्रवेश करने लगे। 1857 में बाबा पदमजी ने "यमुनापर्यटन" नामक प्रथम उपन्यास लिखकर इस नवीन साहित्य प्रकार का शुभारंभ किया। इसी तरह विदृ जदृ कीर्तने के 1861 में लिखे "थोरले माधवराव पेशवे" ऐतिहासिक नाटक के कारण नाट्य साहित्य में नए युग का सूत्रपात हुआ। क्रमश: निबंध, चरित्र, व्याकरण, कोश, धर्मनीति तत्त्वज्ञान, प्रवासवर्णन, इत्यादि अनेक विभागों में साहित्यनिर्माण होने लगा। अंग्रेजी तथा संस्कृत साहित्य के ललित और शास्त्रीय ग्रंथों के मराठी अनुवाद बड़ी संख्या में होने लगे। कृष्ण शास्त्री चिपलूणकर, परशुराम तात्या गोडबोले, लोकहितवादी देशमुख, दादोबा पांडुरंग आदि बहुश्रुत व्यक्तियों ने अनेक विषयों पर ग्रंथरचना कर मराठी वाङ्मय को विकास के क्षेत्र में सभी ओर से नया मोड़ दिया। इस समय के विविध ज्ञानविस्तार, ज्ञानप्रकाश, ज्ञानसंग्रह, दिग्दर्शन आदि नियमित पात्रों ने भी ज्ञान का पौसरा चलाकर मानों नई पीढ़ियों की साहित्यिक पिपासा शांत करने में हाथ बँटाया।




1874 में विष्णु शास्त्री चिपलूणकर द्वारा शुरू की गई निबंधमाला के कारण मराठी साहित्य में ही नहीं अपितु महाराष्ट्र की विचारपरंपरा में भी क्रांति होकर नए युग की प्रतिष्ठापना हुई। नव सुशिक्षित वर्ग में अपना देश, अपनी भाषा, अपनी संस्कृति आदि के संबंध में स्वाभिमान जाग्रत हुआ। अंग्रेजी साहित्य के वैशिष्ट्य को आत्मसात् करते हुए वह ऐसे साहित्य के लिये प्रवृत्त हुआ जिससे भारतीय संस्कृति के भविष्य का पोषण होता। झ्र्श. ग. तुड़पुड़ेट



 

Wednesday, February 3, 2010

मराठी में साहित्य अकादमी पुरस्कार


मराठी में साहित्य अकादमी पुरस्कार
मराठी साहित्य में विशिष्ट योगदान के लिए हर साल मराठी साहित्यकारों को साहित्य अकादमी की ओर से साहित्य अकादमी पुरस्कार दिए जाते हैं।




पुरस्कार विजेते साहित्यकार और उनके किताबों की सूची इस प्रकार है-



१९५५ – तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी – 'वैदिक संस्कृतिचा विकास'

१९५६ – बी.एस. मर्ढेकर – 'सौंदर्य आणि साहित्य'

१९५७ – कोई पुरस्कार नहीं

१९५८ – चिंतामणराव कोल्हटकर – 'बहूरूपी'

१९५९ – जी. टी. देशपांडे – 'भारतीय साहित्यशास्त्र'

१९६० – विष्णु सखाराम खांडेकर – 'ययाति'

१९६१ – डी.एन. गोखले – 'डॉ. केतकर'

१९६२ – पी.वाय. देशपांडे – 'अनामिकेची चिंतनिका'

१९६३ – एस.एन. पेंडसे – 'रथचक्र'

१९६४ – रणजित देसाई – 'स्वामी'

१९६५ – पु.ल. देशपांडे – 'व्यक्ति आणि वल्ली'

१९६६ – टी.एस. शेजवळकर – 'श्री शिव छत्रपति'

१९६७ – एन.जी. केळकर – 'भाषाः इतिहास आणि भूगोल'

१९६८ – इरावती कर्वे – 'युगांत'

१९६९ – एस.एन. बनहट्टी – 'नाट्याचार्य देवल'

१९७० – एन.आर. पाठक – 'आदर्श भारत सेवक'

१९७१ – दुर्गा भागवत – 'पैस'

१९७२ – गोदावरी परूळेकर – 'जेंव्हा माणुस जागा होतो'

१९७३ – जी.ए. कुळकर्णी – 'काजळमाया'

१९७४ – विष्णु वामन शिरवाडकर – 'नटसम्राट'

१९७५ – आर.बी. पाटणकर – 'सौंदर्य मिमांसा'

१९७६ – जी.एन. दांडेकर – 'स्मरणगाथा'

१९७७ – ए.आर. देशपांडे 'अनिल' – 'दशपदी'

१९७८ – सी.टी. खानोलकर 'आरती प्रभु' – 'नक्षत्रांचे देणे'

१९७९ – शरदचंद्र मुक्तिबोध – 'सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमुल्य'

१९८० – मंगेश पाडगांवकर – 'सलाम'

१९८१ – लक्ष्मण माने – 'उपरा'

१९८२ – प्रभाकर पाध्ये – 'सौंदर्यानुभव'

१९८३ – व्यंकटेश माडगुळकर – 'सत्तांतर'

१९८४ – इंदिरा संत – 'गर्भरेशमी'

१९८५ – विश्राम बेडेकर – 'एक झाड आणि दोन पक्षी'

१९८६ – एन.जी. देशपांडे – 'खूण गाठी'

१९८७ – आर.सी. ढेरे – 'श्री विठ्ठलः एक महासमन्वय'

१९८८ – लक्ष्मण गायकवाड – 'उचल्या'

१९८९ – प्रभाकर उर्ध्वरेशे – 'हरवलेले दिवस'

१९९० – आनंद यादव – 'झोंबी'

१९९१ – भालचंद्र नेमाडे – 'टीका स्वयंवर'

१९९२ – विश्वास पाटिल – 'झाडा झडती'

१९९३ – विजया राजाध्यक्ष – 'मर्ढेकरांची कविता'

१९९४ – दिलीप चित्रे – 'एकूण कविता – १'

१९९५ – नामदेव कांबळे – 'राघव वेल'

१९९६ – गंगाधर गाडगीळ – 'एका मुंगीचे महाभारत'

१९९७ – एम.वी.धोंड – 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टि'

१९९८ – सदानंद मोरे – 'तुकाराम दर्शन'

१९९९ – रंगनाथ पाठारे – 'ताम्रपट'

२००० – एन.डी. मनोहर – 'पानझड'

२००१ – राजन गावस – 'टणकट'

२००२ – महेश एलकुंचवार – 'युगांत'

२००३ – टी.वी. सरदेशमुख – 'डांगोरा एका नगरीचा'

Tuesday, February 2, 2010

ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित मराठी साहित्यकार

ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित मराठी साहित्यकार



विष्णु सखाराम खांडेकर




विष्णु वामन शिरवाडकर (कवि कुसुमाग्रज)



विंदा करंदीकर



Monday, January 11, 2010

गीर अभयारण्यात साठ वन्य जीवांचा मृत्यू


गीर अभयारण्यात साठ वन्य जीवांचा मृत्यू

अहमदाबाद - वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी असलेले गुजरातमधील गीर अभयारण्य आता मानवी हस्तक्षेपामुळे जीवघेणे ठरत आहे. गेल्या पाच वर्षांत या भागात वाढत्या रहदारीमुळे सुमारे साठ वन्य जीवांना आपले प्राण गमवावे लागले.




मानवाच्या घुसखोरीमुळे बळी गेलेल्या या वन्य जीवांमध्ये तीन पाली आणि नऊ हरणांचा समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी रात्री भरधाव जाणाऱ्या वाहनामुळे ससान गावाजवळील नदी पुलावर एका वृद्ध सिंहाचा मृत्यू झाला. पाणी पिण्यासाठी नदीकडे जात असलेल्या या सिंहाच्या अंगावर वाहन आले. जीव वाचविण्यासाठी त्याने पुलावरून खाली उडी मारली. या वेळी झालेल्या गंभीर दुखापतीमुळे या सिंहाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे गीर अभयारण्यात रात्रीची वाहतूक बंद करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली.
 
 
Ref :- eSakal

वाघांशी मैत्री करणारा पर्यावरणवादी

वाघांशी मैत्री करणारा पर्यावरणवादी

बिली अर्जनसिंग यांच्या निधनाने अस्तंगत होत चाललेल्या वाघांचा एक भक्कम आधार गेला आहे. या निसर्गप्रेमी कलंदर व्यक्तिमत्त्वाविषयी...

एखादे ध्येय निश्‍चित करून त्याप्रमाणे आयुष्य जगण्याची संधी फार कमी जणांना मिळते. व्याघ्रप्रेमी आणि प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ बिली अर्जनसिंग त्यातील एक. वृद्धापकाळाने त्यांचे नुकतेच वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आणि अस्तंगत होऊ पाहणाऱ्या वाघांचा एक भक्कम आधार जणू हरपला...



कपूरथळ्याच्या राजघराण्याशी संबंधितांच्या कुटुंबात जन्मलेले, तत्कालीन "ब्रिटिश इंडियन आर्मी'मध्ये सेवा बजावलेले, तरुणपणी वाघांची शिकार केलेले आणि उत्तरायुष्यात वाघांच्या, निसर्गाच्या संवर्धनासाठी जगणारे आणि वन्य जीवनावरच्या अनेक पुस्तकांचे लेखक म्हणून पर्यावरणप्रेमींना बिली अर्जनसिंग परिचित होते. उत्तर प्रदेशाच्या लखिमपूर-खेरी जिल्ह्यातील दुधवा अभयारण्याच्या निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते कोठेही राहू शकले असते; पण त्यांनी दुधवा अभयारण्याचीच निवड केली आणि निवासस्थानाला नाव दिले, तेही समर्पक : "टायगर हेवन.' अखेरचा श्‍वासही त्यांनी तेथेच त्यांच्या लाडक्‍या अरण्याच्या सहवासात घेतला आणि आपले अंत्यसंस्कारही "ज्युलिएट' व "प्रिन्स' या त्यांनी वाढविलेल्या बिबट्यांच्या दफनभूमीशेजारी करावेत अशी अंतिम इच्छाही व्यक्त केली आणि त्याची पूर्तता त्यांच्या कुटुंबीयांनी केली.



बिली अर्जनसिंग यांचा जन्म 15 ऑगस्ट 1917 चा. तत्कालीन "ब्रिटिश इंडियन आर्मी'मध्ये त्यांनी 1940 मध्ये प्रवेश केला तेव्हा ते सेकंड लेफ्टनंट होते आणि 1946 मध्ये त्यांनी लष्कर सोडले तेव्हा ते लेफ्टनंट होते. लष्करातून बाहेर पडल्यावर बिलींनी निसर्गाच्या संवर्धनाकडे लक्ष पुरविण्यास प्रारंभ केला. ब्रिटिश राजवटीत झालेल्या अनिर्बंध शिकारीमुळे भारतातील वाघांची संख्या घटू लागली होती व स्वातंत्र्योत्तर काळात निसर्गप्रेमींनी वाघांसाठी आवाज उठवायला प्रारंभ केला. भारतात आज निसर्गसंवर्धानाच्या चळवळी जोर धरत आहेत आणि त्याचे थोडे श्रेय बिलींना द्यायला हवे. वाघांवर त्यांनी कायम प्रेम केले आणि अनाथ बछड्यांनाही सांभाळले. बंदिवासात वाघांचे प्रजनन करून त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याच्या त्यांच्या कल्पनेला काही काळ विरोधही झाला. याच काळात बिलींच्या कानावर दुधवा जंगलाची साद आली आणि 1959 पासून ते तेथे राहावयास गेले, ते कायमचेच. जंगलाजवळ "टायगर हेवन' उभे राहिले आणि बिलींनी तेथूनच जगाचा निरोप घेतला. दुधवा अभयारण्याच्या स्थापनेत त्यांचा वाटा मोलाचा आहे.



वाघ आणि बिबटे म्हणजे फक्त रक्ताला चटावलेले हिंस्त्र प्राणी, ही समजूत बिलींनी त्यांचे पालकत्व पत्करून खोटी ठरवली. प्राण्यांचा सांभाळ करतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी शब्दबद्धही केले आणि त्यांच्या अनुभवांवर काही लघुपटही निघाले. वन्य जीवांच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांवर "टायगर हेवन', ब्रिटनमधून आणलेल्या वाघिणीचे संगोपन करून तिला निसर्गात सोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरचे "तारा' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली. त्याशिवाय "टायगर टायगर', "ए टायगर्स स्टोरी', बिलींच्या लाडक्‍या "हॅरिएट' बिबट्यावरचे "प्रिन्स ऑफ कॅट्‌स' तसेच "एली अँड द बिग कॅट्‌स', "टायगर बुक' आणि "वॉचिंग इंडियन वाईल्डलाईफ' ही पुस्तकेही बिली अर्जन सिंग यांनी लिहिली. त्यांच्या या निसर्गसंवर्धनाच्या कार्याची नोंद घेत डफ हार्ट-डेव्हिस या लेखकाने "ऑनररी टायगर- द लाईफ ऑफ बिली अर्जन सिंग' हे पुस्तकही त्यांच्यावर लिहिले.



बिलींच्या कार्यावर केवळ पुस्तकच लिहिले गेले नाही, तर "लेपर्ड ऑफ द वाईल्ड', "टायगर टायगर' आणि "द फायर ऑफ थाईन आईज' हे व्हिडिओपटही निघाले. बिली अर्जनसिंग यांच्या कार्याची नोंद सरकारनेही घेतली. 1995 मध्ये त्यांना "पद्‌मश्री' आणि 2006 मध्ये "पद्‌मभूषण' हे सन्मान प्रदान करण्यात आले. तत्पूर्वी आणखी एक मोठा सन्मान त्यांना लाभला. तो होता "जे. पॉल गेट्टी वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ऍवॉर्ड.' हा सन्मान विश्‍व प्रकृती निधीतर्फे (डब्ल्यूडब्ल्यूएफ) प्रदान केला जातो.



वयोमानानुसार बिली थकत गेले, पण अखेरपर्यंत त्यांचे निसर्गप्रेम कायम होते आणि अखेरचा श्‍वासही त्यांनी घेतला तो त्यांच्या लाडक्‍या अरण्यात, प्राण्यांच्या सहवासात...

Ref : - eSakal

Saturday, January 2, 2010

निरोप - कविता


निरोप - कविता

काळाच्या या नाजुक गाठी


दातांनीही सुटतिल ना

हळूच उमलती पंख हे कोमल

दो हातांनि मिटतिल ना ॥



काळ बसला मारित गाठी

मिटुनि डोळे लावुनि मन

वैशाख वणवा अलगद पेटे

कातरस्मृतींचे जळते वन ॥



कालाचे हे चाक दातेरी

ना कधीही मागे फिरे

कोण चिरडते पदी तयाच्या

कोण उरे आणि कोण मरे ॥



प्रसन्नतेचा झरा खळाळे

ओसंडुनि हे गात्र न् गात्र

निरोप देतो तुजला आता

भरूनि गेले घटिका पात्र ॥


- मुन्ना बागुल

Tuesday, December 8, 2009

खासदारांच्या 'दांडीयात्रां'वर यापुढे नियंत्रण येणार

खासदारांच्या 'दांडीयात्रां'वर यापुढे नियंत्रण येणार


नवी दिल्ली - सुटीनंतरचा पहिला दिवस आला की मार दांडी...आठवड्याचा अखेरचा दिवस आला की मार दांडी...संसदीय कामकाजातील महत्त्वाचा भाग असलेल्या तारांकित प्रश्‍नोत्तरांच्या तासातील खासदारांच्या या "सर्वपक्षीय' उदासीनतेवर आता जालीम उपाय करण्याचा विचार लोकसभा व राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी केला आहे. याबाबतच्या नियमावलीत सुधारणा लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याचे संकेत खुद्द राज्यसभेच्या अध्यक्षांनी आज दिले.




संबंधित खासदार हजर नसेल, तर त्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देणे किमान मंत्र्यांना बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे मूळ प्रश्‍न विचारणारा हजर नसला, तरी पुरवणी प्रश्‍न विचारणाऱ्या खासदारांना त्याचे उत्तर मागण्याचा हक्क असेल, अशा प्रकारच्या संभाव्य उपाययोजना असतील, असे सांगण्यात येते.



दर सोमवारी दोन्ही सभागृहांतील प्रश्‍नोत्तराचा तास "उदास'च असतो. मतदारसंघाचे प्रश्‍न देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर मांडण्याची संधी देणाऱ्या, दर प्रश्‍नाला एक लाख रुपये (रोज

14-15 लाख रुपये) असा खर्च येणाऱ्या त्या तासाबद्दलची ही उदासीनता पक्षभेदांच्याही पलीकडे गेल्याचे चित्र काही वर्षांत ठळक झाले. बाहेरच्या राज्यांतून येणारे खासदार सोमवारी संसदेत वेळेवर येत नाहीत, हे सर्वज्ञात आहे. यासाठी रेल्वे लेट झाली, धुक्‍याने विमानच खाली उतरले नाही इथपासून दिल्लीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली इथपर्यंतची कारणे आता खासदार देऊ लागले आहेत! इतकी वर्षे याबाबत फारशी हालचाल नव्हती. मात्र, गेल्या सोमवारी लोकसभेत प्रश्‍नोत्तरांचा तासच कोलमडला आणि या घटनेबाबत चर्चेला उधाण आले. लोकसभा व राज्यसभेत अनेक मंत्र्यांनी व सदस्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली.



राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी हे तर सभागृहातील शिस्तीचे पक्के भोक्ते. त्यांनी याबाबत वारंवार नाराजी व्यक्त केली होती. खासदार भारतकुमार राऊत यांनी अन्सारी यांना पत्र पाठवून याबाबत उपाय करण्याची मागणी केली होती. त्यांनी पत्रात म्हटले होते, की प्रश्‍न विचारण्यासाठी हजर न राहण्याचे प्रमाण वाढत असून, संसदीय लोकशाहीसाठी ते चांगले लक्षण नाही. यासाठी अनुपस्थित खासदारांचा त्या संपूर्ण दिवसाचा भत्ता कापून घ्यावा. इतर खासदारांनीही विविध सूचना केल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर या सुधारणा अपेक्षित आहेत.



अनुपस्थितीची दखल घेतल्यानेच...

लोकसभा व राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनीही खासदारांच्या या अनुपस्थितीची गंभीर दखल घेतली. सध्याच्या नियमांनुसार प्रश्‍न विचारणारा हजर नसेल, तर तो प्रश्‍नच वाया जातो. अशा स्थितीत संबंधित खासदार हजर नसेल, तर त्या तारांकित प्रश्‍नाला किमान मंत्र्यांकडून उत्तर तरी मिळेल, अशा प्रकारची सुधारणा प्रस्तावित असल्याची माहिती समजली. राज्यसभेत आज (सोमवारी) क्र.242 ते 247 यादरम्यानचे बहुतांश प्रश्‍न विचारणारे खासदार नव्हते. काही सदस्यांनी याबाबत तक्रार केली, तेव्हा अन्सारी यांनी ""काळजी करू नका. याबाबत उपाययोजनेची यंत्रणा लवकरच अमलात येईल,'' असे सांगितले. त्यानंतर माहिती घेतली असता, वरील "उपाय' प्रस्तावित असल्याचे समजले.

बाबरीप्रश्‍नी शिवसेना लोकसभेत आक्रमक

बाबरीप्रश्‍नी शिवसेना लोकसभेत आक्रमक

नवी दिल्ली - "1942 च्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही रामजन्मभूमी आंदोलन अधिक उग्र होते आणि त्याचे नेतृत्व शिवसेनेने केले याचा अभिमान वाटतो', असे प्रतिपादन शिवसेनेचे गटनेते अनंत गिते यांनी मंगळवारी लोकसभेत व्यक्‍त केला. साऱ्या देशात बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नव्हते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच पुढे येऊन शिवसैनिकांनी हे काम केले असेल, तर त्याची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली होती, याची आठवण करून देत या आंदोलनाचे श्रेय केवळ भाजपला जाऊ नये, याची खबरदारीही शिवसेनेने घेतली.




लिबरहान आयोगावरील चर्चा शेवटच्या टप्प्यात असताना ती तापण्यास गिते यांच्या भाषणापासूनच सुरवात झाली. "लिबरहान आयोगाच्या अहवालामध्ये बाबरी मशीद पाडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे अयोध्येत होते', असे म्हटल्यावर आक्षेप घेऊन लिबरहान यांनी तरी हा अहवाल वाचला आहे का, अशी पृच्छा केली.



शिवसेनेला चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या दृष्टीने केलेल्या या भाषणाने सभागृहातील वातावरण बिघडू लागल्याने लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनी गिते यांना संवेदनशील विषयावर बोलताना शब्द जपून वापरण्याची सक्‍त ताकीदच दिली. "बाबरी मशीद पाडणे हे काही चुकीचे पाऊल नव्हते. वादग्रस्त वास्तू पडल्याचा शोक देशाने 17 वर्षे करण्याची काय आवश्‍यकता आहे', असा सवाल करून गिते यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. त्यांच्या या वक्‍तव्यावर सभागृहात कमालीचा गोंधळ झाला. बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांमुळे असुरक्षित वाटणे धोकादायक असल्याचे वक्‍तव्य करून ते म्हणाले, "भारतातील संसदेत आहात म्हणून अल्पसंख्याकांना अशा प्रकारे वागता येते. मात्र, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना अशा प्रकारची मोकळीक नाही.' यावर जम्मू - काश्‍मीरमधील खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यावर काश्‍मीरमधून साडेतीन लाख हिंदूंना स्थलांतर का करावे लागले, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.



गिते हिंदीतून भाषण करायला लागल्यावर "हिंदीतून बोलाल तर महाराष्ट्रात राज ठाकरे तुम्हाला जाब विचारतील, मुंबईत मारलेले बिहारी हिंदू नव्हते का', अशा प्रकारची शेरेबाजी सत्ताधाऱ्यांनी केली. गिते जाणीवपूर्वक वातावरण तापविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे लक्षात आल्यावर गृहमंत्री पी. चिदंबरम हेदेखील अस्वस्थ झाले होते.
 
Ref :- eSakal