Saturday, January 2, 2010
निरोप - कविता
निरोप - कविता
काळाच्या या नाजुक गाठी
दातांनीही सुटतिल ना
हळूच उमलती पंख हे कोमल
दो हातांनि मिटतिल ना ॥
काळ बसला मारित गाठी
मिटुनि डोळे लावुनि मन
वैशाख वणवा अलगद पेटे
कातरस्मृतींचे जळते वन ॥
कालाचे हे चाक दातेरी
ना कधीही मागे फिरे
कोण चिरडते पदी तयाच्या
कोण उरे आणि कोण मरे ॥
प्रसन्नतेचा झरा खळाळे
ओसंडुनि हे गात्र न् गात्र
निरोप देतो तुजला आता
भरूनि गेले घटिका पात्र ॥
- मुन्ना बागुल
Labels:
Marathiworld,
mi marathi,
मराठी,
मराठी कविता,
मराठी वर्ल्ड,
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment