Monday, January 11, 2010

गीर अभयारण्यात साठ वन्य जीवांचा मृत्यू


गीर अभयारण्यात साठ वन्य जीवांचा मृत्यू

अहमदाबाद - वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी असलेले गुजरातमधील गीर अभयारण्य आता मानवी हस्तक्षेपामुळे जीवघेणे ठरत आहे. गेल्या पाच वर्षांत या भागात वाढत्या रहदारीमुळे सुमारे साठ वन्य जीवांना आपले प्राण गमवावे लागले.




मानवाच्या घुसखोरीमुळे बळी गेलेल्या या वन्य जीवांमध्ये तीन पाली आणि नऊ हरणांचा समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी रात्री भरधाव जाणाऱ्या वाहनामुळे ससान गावाजवळील नदी पुलावर एका वृद्ध सिंहाचा मृत्यू झाला. पाणी पिण्यासाठी नदीकडे जात असलेल्या या सिंहाच्या अंगावर वाहन आले. जीव वाचविण्यासाठी त्याने पुलावरून खाली उडी मारली. या वेळी झालेल्या गंभीर दुखापतीमुळे या सिंहाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे गीर अभयारण्यात रात्रीची वाहतूक बंद करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली.
 
 
Ref :- eSakal

No comments:

Post a Comment