Tuesday, August 17, 2010

बदल : काळाची गरज

बदल हा नेहमीच हळुवार होत असतो; परंतु त्याकडे डोळसपणे बघणे आणि त्याप्रमाणे आपल्या वागण्यात बदल करणे म्हणजे बदलत्या जगाशी जुळवून घेणे. बदलाचे प्रयत्न उत्साहाने राबवावेत, जोपर्यंत मूळ उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत प्रयत्न सातत्याने चालू ठेवावेत.




एकदा एक प्रयोग केला गेला. एका पाण्याने भरलेल्या भांड्यात एका बेडकाला सोडण्यात आले. ते भांडे मंद अशा विस्तवावर ठेवले. पाणी हळूहळू तापू लागले; परंतु तो बेडूक ते ऊबदार पाणी शेकत शांतपणे बसून राहिला.

बेडकाला हा उबदारपणा आवडला होता. त्यामुळे बेडूक अगदी खुशीत होता; परंतु जसजसे तापमान वाढू लागले, तसे बेडूक अस्वस्थ होऊ लागले; परंतु तरीही ते पाण्याबाहेर यायचा प्रयत्न करीत नव्हते. एका ठराविक तापमानावर पाणी गरम झाल्यावर बेडूक पाण्यातच राहिला व त्यातच मरण पावला.



बोध : बदल हा नेहमीच हळूवार होत असतो; परंतु त्याकडे डोळसपणे बघणे आणि त्याप्रमाणे आपल्या वागण्यात बदल करणे म्हणजे बदलत्या जगाशी जुळवून घेणे.



बदल कसा स्वीकारावा?

'द आइसबर्ग इज मेल्टिंग' या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक जॉन कोटर (जे "चेन मॅनेजमेंट' या संकल्पनेचे गुरू मानले जातात) यांनी बदल कसा घडवावा यासाठी आठ तत्त्वे सांगितली आहेत. ही तत्त्वे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एका सोसायटीत 50 बिऱ्हाडे आहेत व पाणीकपातीची चर्चा सुरू आहे.



महत्त्वाची आठ तत्त्वे

सोबतची आठ तत्त्वे आपण आपल्या दैनंदिन जीवनात, घरी, नोकरीच्या ठिकाणी वापरली असतीलच; पण याचा जाणीवपूर्वक उपयोग केला, तर बदल हा आनंददायी होऊ शकतो.

Ref :eSakal

No comments:

Post a Comment