Monday, May 10, 2010

सुविचार



-पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)


- दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.

- त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)

- युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.

- जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा!

- जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.

- लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.

- आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.

- सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.

- माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.

- दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुस-याला प्रजलीत करते.

- आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.

- सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !

- उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.

- जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.

- संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.

- ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.

- शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.

- कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!

- मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.

- अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.

- चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.

- काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.

- कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.

- उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.

- कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.

- पवित्र असावे पण पतित होऊ नये.

- त्याग करावा पण ताठा नसावा.

- स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.

- आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.

- स्वतंत्र असावे पण स्वै नसावे.

- घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.

- माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.

- सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर...परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!

- मानवी संबंध धावणा-या आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.

- श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.

- ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.

No comments:

Post a Comment