Monday, May 10, 2010

सुविचार

-पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला विंधते.


- श्रध्दावान, बुध्दीवान, कर्तृत्ववान व ऐश्वर्यवान माणसाची ती कोठेही गेली तरी हार्दिक स्वागत होते. (गौतम बुध्द)

- विचारांचा चिराग झाला तर आचार आंधळा बनेल. (विनोबा भावे)

- प्रसंगावधान महत्त्वाचे.

- जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.

- कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते. (महात्मा गांधी)

- जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळत नाही. (इमर्सन)

- सुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होते. (लेडी मॉटेज)

- समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.

- पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो.

- यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात.

- हि-याहूनही 'ज्ञान' अधिक मौल्यवान आहे.

- आपले प्रत्येक कृत्य हे आयुष्यातले शेवटचे कृत्य आहे असे समजून वागत जा!

- मनुष्याला आपल्या दारिद्रयाची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणाची.

- दुस-यांनी तुमच्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास आपणही त्यांच्याशी तसेच वागले पाहिजे.

- मार्गातील अनेक अडचणी बाजूला सारून, जो पुढे पाऊल टाकतो त्यालाच यश मिळते. अलीकडच्या तीरावर बसून जो नुसता संकल्प करतो त्याला यश मिळत नाही.

- मन अतिशय सुंदर आहे (असते) त्याला प्रसन्न ठेवयाशिवाय आपल्याला चालना येत नाही.

- कष्टाने पैसा मिळवावा.

- सततच्या वापराने जिची धार वाढतच जाते अशी एकमेव सुरी म्हणजेच जीभ.

- स्वत:साठी जे करू ते स्वत:बरोबरच संपते.

- शस्त्र हे धारण करणा-यालाही घातकच असते.

- देण्याची पात्रता जो कमावतो त्यालाच घेण्याचा अधिकार असतो.

- नव्या बादलीतून पाणी तर गळत नाही ना, याची खात्री होईपर्यंत जुनी बादली फेकून देऊ नये.

- स्वप्ने प्रत्यक्षात यायला हवी असतील तर झोपून राहू नका.

- जास्त मिळवायचे असेल तर मुळात अपेक्षा कमी मिळविण्याची ठेवा.

- ह्दयाची श्रीमंती नसेल तर कुबेरही भिकारडाच राहतो.

- कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्च सामर्थ्य.

- काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश ओढवून घेतात.

- अयोग्य माणसा बरोबर आनंद करण्यापेक्षा योग्य माणसाबरोबर दु:खात राहणे बेहत्तर.

- झोप आली असतांना जो झोपी जात नाही आणि झोप येत असतांना जो जागा राहतो असा मनुष्य, हा भूतलावर एक मात्र प्राणी आहे.



- जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय साधला गेला पाहिजे.

- शांतता टिकविण्याचे सामर्थ्य नसेल तर तो नेता होऊ शकणार नाहीत (महात्मा गांधी)

- समाज, देश व जगातील सर्वात जटील समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजे चारित्र्य.

- शांतता बाहेर सापडणे फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेली असावी.

- अडचणी आल्याशिवाय खरा मित्र कोण ते कळत नाही.

- राग आणि सहनशीलता हे योग्य समंजसपणाचे जुळे शत्रू आहेत.

- आपण सुस्वभावी आणि प्रेमळ असल्यास आपोआपच प्रेम मिळते.

- मान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी तो देणे होय.

- व्यक्तिच्या मनात वसत असलेला सलोखा गुण्यागोंविदाने राहणा-या समाजाला प्रतिबिंबीत करीत असतो.

- सर्वकाही आनंदीवृत्तीने केल्यास करायला कठीण असे कोणतेच काम असणार नाही.

- चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.

- कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडता कामा नये.

- गुणवत्तेच्या दारी पोहचण्याआधी घाम गाळला पाहिजे हेच उत्तम ध्येय ठेवावे.

- प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.

No comments:

Post a Comment